Skip to playerSkip to main content
  • 7 hours ago
रत्नागिरी - जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून राजापूर शहराला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ​राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीची पातळी 2.85 मीटरच्या वर गेलेली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, असाच पाऊस पुढेही सुरू राहिला, तर राजापूर बाजारपेठेतील मुख्य केंद्र असलेल्या जवाहर चौकात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. ​दुसरीकडे, खेड तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असलेली जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर पोहोचली आहे. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर इतकी नोंदवली गेली असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला येत्या 6 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आले आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00In the area of the city, we are living in the city of Rathnagri, at the city of the city
00:06of Rathapur.
00:08We are living in the city of Rathapur, and we are living in the city of Rathapur,
00:58Thank you very much.
00:59My family's friends and friends, and they even have a word that's in there for lunch.
01:08We found it this orange alert in the city.
01:11But the village people lived around the city without a lot.
01:16They gave them the city and they gave them their villages.
01:19So they kind of got to throw back their grief.
01:22Some of them are good for the village of Rajapur.
01:43Thank you very much.
01:53Thank you very much.

Recommended